शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography Of A Farmer Essay In Marathi

शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography Of A Farmer Essay In Marathi

शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध : भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय केला जातो. आपल्या भारतात विविध प्रकारचे शेतकरी शेती करतात. आणि शेती हाच भारतातील मुख्य व्यवसाय मानला जातो कुकुट पालन शेती हे सर्व व्यवस्था आपल्या भारतात केले जातात.

शेतकरी हा पीक पिकवतो. आणि ते विकतो परंतु त्याला बाजारामध्ये त्याने घेतलेल्या कष्टाचे फळ किंवा त्याने केलेल्या कष्टाचा मोबदला मिळतो का हे आज आपण या निबंधामध्ये बघणार आहोत आणि शेतकऱ्याचा अंतर्मन किंवा शेतकऱ्याचा आत्मकथन आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi Essay On Farmer
शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi Essay On Farmer

शेतकऱ्याचे मनोगत निबंध | Shetkaryache Manogat Marathi Nibandh

निबंध 1

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि इथे मुख्यतः शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो येथील बहुतांश लोक शेती करतात. आणि आपलं घर चालवतात. शेतकऱ्याच्या जीवावरच पूर्ण जग जगत आहे शेतकऱ्याच्या कष्टामुळेच आपला आज दोन वेळेचं खायला भेटते. कारण त्याने पिकवलच नाही तर आपण खाणार कुठून.

आपण शेतकरी म्हणलं की आपल्याला आठवतो कष्टाळू व्यक्ती जो दोन बैल घेऊन शेत नांगरतो . आणि पिकांना पाणी भरतो आणि पीक मोठे झाले की त्यांना विकून पैसे कमवतो आणि सुखाचे जीवन जगतो. परंतु खरंच असे आहे का? आपल्या भारतातील प्रत्येक शेतकरी सुखी आहे का?

आपण याचा कधी विचारच करत नाही जो आपल्या सर्वांसाठी पिकवतो त्याचा आपण कधी विचारच करत नाही. आता यात शेतकऱ्याच्या अंतर्मनाला काय वाटत असेल आपण ते बघणार आहोत.

मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | shetkari boltoy Marathi nibandh

निबंध 2

मी बाबुराव कोरडे हाडाचा शेतकरी. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला आहे परंतु कधी माझी काळी माती सोडून माझी काळी आई सोडून कुठे गेलो नाही. कारण आईची सेवा हीच मला खरी सेवा वाटते. खूप छान वाटतं या निसर्गात राहायला. मी एक शेतकरी म्हणून माझे एक सुखी जीवन जगतोय.

माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजता होते उठल्या उठल्या मी पहिल्यांदी माझ्या कोंबड्यांचा दरवाजा उघडून देतो आणि त्यांना मुक्त करतो. त्यानंतर माझ्याकडे 15 गाय आहे आणि तीन कारवाडी आहे त्यांचं सर्व आवरून घेतो. त्यांचा आवरणे मध्ये माझा खूप वेळ जातो त्यानंतर चारा आणायला मी आणि माझी मंडळी जातो. मी तीन एकराचा घास केलेला आहे. आणि डाळिंबाचे बाग देखील आहे. त्याचसोबत वावरात उसाचे पीक देखील आहे.

सर्वांना वाटत असेल शेतकरी एक सुखी माणूस आहे परंतु खरं सांगायचं तर शेतकऱ्या इतका दुर्दैवी माणूस कोणीच नाही. परंतु शेतकऱ्याला सवय असते की किती दुःख आले किती संकट आले तरी त्यांवर मात करायची आणि आनंदी आयुष्य जगायचं. मागच्या वर्षी सोयाबीन काढायच्या वेळेला पाऊस आला आणि माझी पाच एकर सोयाबीन वाहून गेली. प्रचंड खर्च केला होता त्यावर आणि आशा होती की त्यातून खूप सारा पैसा भेटेल परंतु सगळच वाहून गेले पिक.

गहू करतो सोयाबीन करतो ऊस डाळिंब सर्व पीक आम्ही करतो परंतु कधी कधी नफा होतो तसा कधी कधी तोटा देखील होतो आणि आमचे शेतकऱ्यांचे सगळे जीवन निसर्गाच्या हातात आहे कधी जेव्हा लागतो तेव्हा पाऊस येत नाही आणि जेव्हा नाही लागत तेव्हा पूर्णपणे पाऊस येतो. मी सगळं वाटोळ करून टाकतो.

मी सर्व समजतात की जगाचा पोशिंदाखुश आहे आनंदी आहे परंतु असे काही नाहीये. आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला त्याचं फळ भेटत नाही तेव्हा खूप दुःख होतं परंतु एखाद्या वर्षी जे कष्ट घेतले त्याचे चीज होतो त्यावर्षी खूप आनंद होतो आणि हा जगाचा पोशिंदा खूप आनंदी होतो. आता काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव वाढले होते तर आम्ही देखील टोमॅटो लावले परंतु टोमॅटोला टोमॅटो आले आणि लगेच भाव खाली.

मला माझा एक हालाकीचा किस्सा आठवतोय पाठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो. आमची सोयाबीन काढायला होती मशीन आलं होतं आणि पूर्ण पाऊस आला जोरदार पावसाचा मारा सुरू झाला आणि सोयाबीन सोंगायचं मशीन देखील चालू होतं त्याला बंद केलं आणि सगळी सोयाबीन काढलेली ओली झाली ती सोयाबीन पाऊस बंद झाल्यावर घरी आणली घरात टाकली आणि सोयाबीन जास्त असल्याकारणाने घरात बसली नाही त्यामुळे मोठा थर एकावर एक ठेवावा लागला सोयाबीनचा आणि दोनच दिवसात पूर्ण सोयाबीन सडून गेली.

आम्ही आमच्या परीने जितके पंखे लावता येईल तितके लावले तिला सुकवण्यासाठी परंतु तरीही तिला बुरशी आली आणि ती सोडून गेली इतकी सुंदर दिसणारी पिवळी गार पिवळी सूट सोयाबीन आमच्या डोळ्यासमोर सोडून गेली खराब झाली एका शेतकऱ्याचे मन पूर्ण कासावी होऊन जातो पूर्ण त्या काळजाचे तुकडे होऊन जातात असे स्वतःचे पीक स्वतः समोर खराब होताना बघतो आणि त्या वेळेस आठ ते नऊ दिवस पूर्ण पाऊस होता घराच्या बाहेर जाता येत नव्हतं आणि खूप सगळीकडे ओलावा पसरलेला होता लाईट पण नव्हती.

अशी काही किसी असतात ना की जे आठवले तरी देखील अंगावर काटा येतो त्यातील हा एक किस्सा. सर्व कधीकधी साथ देत नाही त्यामुळे पिके वाया जातात परंतु कधी कधी निसर्गाने साथ दिली तर पिके खूप नफा देतात. तू काळया आईची सेवा करण्यात जो सुख आहे ते कुठल्याच गोष्टीत नाहीये. मला अभिमान वाटतो मी शेतकरी असल्याचा.

शेतकऱ्याचे आत्मवृत मराठी निबंध | Autobiography Of A Farmer Essay In Marathi

विद्यार्थी मित्रांनो हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध हा खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे तुम्ही हा एकदा वाचून जा तुम्हाला नक्कीच हा निबंध उपयुक्त ठरेल आणि जर या निबंध मध्ये काही चुका तुम्हाला आढळले असेल तर त्या देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Comment